भारताची पूर्वीचे जुन्या गावाची राहणीमानाची शैली चा विचार केला तर ,खूपच कठीण परिस्थितीमध्ये या लोकांनी आपले जीवन हे जगले आहे.
Living conditions and lifestyles of India`s oldest villages
भारतामध्ये पूर्वी काळी जवळपास पाच पिढी अगोदरचे जिवन जर बघायला गेलो तर, त्या काळातील लोकांची गाणी खूप साधी भोळे होते. कारण त्या काळात कोणत्याही सुख सुविधा नव्हत्या कारण या काळात प्रत्येक लोकांची आर्थिक परिस्थिती ही बिकट होती.
कोणतेही जुने गाव म्हटले तर, हे जुने गाव पूर्वी नदीच्या काठावर बसलेले असायचे कारण या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी त्या नदीचा उपयोग होण्याचा आणि त्यापाठपाठ हे नदीचे पाणी त्या गावातील शेतकरी शेतीसाठी उपयोग करायचे आणि त्यातून आपली शेतीच्या उत्पन्ना आपली परिवाराची उपजीविका भागवण्याचे काम करत असत.
जुन्या गावाची परिस्थिती पूर्वी खूपच बिकट परिस्थितीची असल्यामुळे येथील लोकांची जीवन खूपच अवघड असतात. पूर्वी जुन्या गावात राहण्याची चांगल्या प्रकारे साधन म्हणजे राहण्यासाठी घरटे नसायचं कच्च्या मातीची घरटे आणि गवताची छ*** असायची.
जुन्या गावात शहरासारखी शाळा कॉलेज नव्हती कारण जुने गाव ही अत्यंत अति दुर्गम भागात बसलेले बसायचे. जुनी परिस्थिती वाईट असायची. भारतात असे अनेक खेडेगाव आहे आजपर्यंत त्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा निर्माण झालेली नाही. येथील जीवन प्रवास असायचा आणि लोकांची राह ण्याची पद्धत अनोखी वेगळी असायची कारण जुने गाव ही निर्मिती दोन-चार लोकांपासून दोन-चार घरापर्यंत आणि दोन-चार घरापासून 50 घरापर्यंत व 50 घरापासून शंभर घरापर्यंत असायची.
भारतीय संस्कृती खेडेगाव आहेत. त्या लोकांना दळणवळणाच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या कारण भारतातील जुने गाव , हे दगडामध्ये बांधलेली असायची त्या काळात मातीमध्ये, घरे बांधायची आणि मनुष्य आपले जीवन त्या घरामध्ये आयुष्य काढायचे, त्यांच्या खाण्याची व जेवणाची सोय म्हटल्यावर त्यांना जंगली भाज्या जास्त आवडायच्या भारतातील पूर्वीचे लोक जंगली भाज्या व जंगली फळे जास्त प्रमाणात खाऊन टाकायची म्हणजेच त्यांची शरीर निरोगी राहत होते.
जंगलातील कंदमुळे खाऊन जीवनाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणताही आजार कोणताही रोग होत नव्हता. त्याचपाठोपाठ त्यांना पाण्याची सोय म्हणजे नदी तलाव या ठिकाणी पाण्याची सोय होयाची तिथून ती पाणी प्यायची आणि आपली जीवन चालू ठेवायचे.
भारत देशाची एकंदरीत जुन्या गावाची परिस्थिती पाहता, त्या काळात फार वाईट दिवस त्या लोकांनी काढले आहे. पूर्वी कोणतेही तंत्रज्ञान विकसित नव्हते. तरी पण ते लोक पूर्वी थोडीफार शेती व्यवसाय करायचे आणि त्यातून आपल्या परिवाराची जीवन हे चालू ठेवायचे.
जुन्या गावांची परिस्थिती व त्यांचे राहणीमान कसे असायचे हे आपण आता पाहणार आहोत.
जुने गाव म्हटले तर त्या गावात मातीचे घरी असायचे ना कुठे सिमेंटची घरी नसायचे कारण कोणत्याही विकसित सुविधा नसायच्या त्यामुळे त्या लोकांना जगणे फारच कठीण गेले. जुनी परिस्थिती पाहता, अंगावर त्यांच्या कमी वस्त्र म्हणजेच कपडे नसायचे कारण पैसा मुबलक नसल्यामुळे ती आपल्या परिवारासाठी कोणतेही वस्त्र खरेदी करू शकत नसतील . परिवाराची भूभागवण्यासाठी वाटेल तेथे भटकंती करायची आणि जंगलातून कंदमुळे भाजीपाला यासारख्या बऱ्याच गोष्टी ते घेऊन घराकडे म्हणजेच गावाकडे निघायचे.
त्या काळातील अन्नधान्यासाठी कमी प्रमाणात धान्य पिकवत असे, त्या धान्यातून त्यांच्या परिवाराची भूक भागवत असत. आणि जगण्यासाठी वाटेल ते काम करायचे आणि परिवारासाठी संध्याकाळी घराकडे जायचे.
खेड्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, खूपच बिकट आणि हालाखीची असते. कारण खेड्यामध्ये दळणवळणाच्या व इंटरनेटच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध राहत नाही. पूर्वीच्या जुन्या गावांच्या आठवणी व वाचनेतून लक्षात असे येते की, भारतातील जेवढे काही पूर्वी चे जुने गाव हे अति बिकट परिस्थितीत दिवस त्या लोकांनी काढली.
खेडेगावात मूळ व्यवसाय म्हणजे. गुरे ढोरे शेळीपालन हा व्यवसाय या खेड्या गावात केला जातो. उर्वरित जर पाहिले तर जे लोक शेती करतात त्या लोकांसाठी तर फारच दैनिक अवस्था आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी जायचे म्हटले तर रात्रीची जावे लागते. कारण काही अजून भारतामध्ये अशी जुनी गावे आहेत तेथे विजेचा म्हणजेच इलेक्ट्रिसिटी पावर चा कोणताही स्रोत चांगल्या प्रकारे उपलब्ध नाही. म्हणजेच तेथे लाईन फार कमी तास पुरवठा केल्या जातो. खास करून शेतीसाठी जी लाईन दिले जाते ती रात्रीच्या वेळेस दिल्या जाते. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते.
शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा त्यांना जीव मोठी घेऊन काम करावे लागते. कारण रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांचा हिंस्र प्राणी ही त्यांच्या जीवाला धोका व त्यांच्या जीवाला दुखापत करू शकतात.
त्यामध्ये त्यांचा एखाद्य वेळेस मृत्यू सुद्धा त्यांना येऊ शकतो. भारतातील बरेचसे गावामध्ये म्हणजेच जी जुनी गावी आहे त्या गावांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा शेतीसाठी व पिकांसाठी पाणी देण्यासाठी केले असता त्यांचा वन्यजीव प्राण्यांनी त्यांना मृत्यूच्या दारात नेले आहे.
जुनी गाव म्हणजे भारतामध्ये राज्य राज्यात गावामध्ये व शहरांमध्ये फारच मोठे अंतर आहे. शहराची परिस्थिती एकंदरीत पाहता खूप चांगली आहे आणि खेडेगावाची परिस्थिती खूपच वाईट आहे. गलिच्छ नाल्या घरीच अवस्थ असा हा खेडेगावातील प्रकार आहे.
एकूणच खेडेगावाची परिस्थिती ही फारच बिकट पूर्वी होती मात्र आता थोडीफार का होईना सुधारत चालली आहे. कशी पाहायला गेले तर फार कमी विकसित ही जुनी गावी झाली आहे. गावामध्ये पूर्वी दवाखान्याची सोय नसल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर्वीचा विचार केला तर जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू हा आजार झाल्यामुळे झालेला आहे. कारण रस्त्याची सोय नसल्यामुळे त्यांना शहरापर्यंत नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते व कोणतीही वाहन नसल्यामुळे त्या लोकांना शहरांमध्ये उपचारासाठी जाण्यासाठी कोणती व्यवस्था नव्हती म्हणून त्यांचा घरीच मृत्युमुखी पडायचे. तसेच आजारपण लागल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी पैशाची व्यवस्था होत नव्हती आणि त्यांना पैसा न मिळाल्यामुळे योग्य ती उपचार घेता येत नसतात. जुन्या लोकांची परिस्थिती पाहता. खाण्यासाठी घरात अन्न नदाना नसायचा आणि खाण्यासाठी घरामध्ये धान्याचा तुटाळा जास्त निर्माण होण्याचा त्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ यायची.
भारतामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता, जुनी गावी जास्त असल्यामुळे येथील परिस्थिती पूर्वी काळी फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून भारताने जुनी गावांचा निर्माण नव्या गावामध्ये केला आहे. ही जुनी गाव निर्माण करण्यासाठी भारत सरकारने नवीन योजना तयार केली आहे. म्हणजेच भारताच्या संसदेमध्ये नवीन एक विधेयक सादर केले आहे. आणि आर्थिक बजेट तयार केले आहे. या जुन्या गावांना शहराला जोडण्यासाठी नवीन रस्ते तयार करण्याची काम सुरू केली आहे. ही योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना(PMGSY) म्हणून ओळखले जाते. ही योजना या जुन्या गावांना सुधारण्यासाठी व येथील लोकांसाठी दळणवळणाची सोय चांगल्या प्रकारे होण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना भारत सरकारने अमलात आणली आहे. आता या योजनेमुळे बरेच गावी ही नवीन गावात त्यांचे रूपांतर झाले.
तरीपण जुनी गावे म्हटले तर, भारतामध्ये अजून बरीच काही अति दुर्गम भागात व डोंगराळ भागात ही गावी अजूनही तसेच राहिलेली आहे. त्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी या गावांच्या विकासासाठी काही निधी उपलब्ध करून देण्याचे काम चालू आहे.
या डोंगराळ भागातल्या जुन्या गावात गेली पाहायला गेली तर, त्या गावात अजूनही बिकट परिस्थिती आहे. कारण तेथील राहणीमान त्यांची संस्कृती अजूनही वेगळी आहे. भारतामध्ये काही राज्यात काही जमातीचे लोक आदिवासी जमात ही जमात अजूनही डोंगराळ भागात राहत आहे. तिथे कोणतीह अजून दळणवळणाची सोय त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. या जगात जुनी गावी भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे. आदिवासी भागात, पायाला गेले तर तिथेच सुद्धा कोणतीही आरोग्यासाठी व कोणती उपचार घेण्यासाठी दवखाना रस्ते नको ती सडक निर्माण झालेली नाही.
असेच आम्ही एका आदिवासी भागात बघायला गेलो तर तिथे अजूनही जुन्या पद्धतीची राहणीमान आहे. त्या गावात अजूनही एका मातीच्या भांड्यामध्ये जेवण करतात. आणि पिण्याच्या साधन सुद्धा हे लोक मातीची भांडी वापरतात. आणि गावामध्ये मातीचे घरी आहेत. काही गावांमध्ये तर गवताची घरी सुद्धा आहे. तसे पाहायला गेले तर या गावांमध्ये एकही सिमेंट ची घरी नाही. संपूर्ण मातीची घरी व गवताची घरे आहे. खाण्यापिण्याची सोय म्हटलं तर त्यांना नदी , तलावातून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. कारण तिथे कोणत्याही प्रकारचा वाटर सप्लाय नाही फक्त आणि फक्त नदी आणि तलाव अशाच ठिकाणी पिण्याची पाणी निर्माण झाले आहे. कारण इथे कोणतीही सुख सुविधा अजून पर्यंत पोहोचलेली नाही.
एकंदरीत जुन्या गावांची परिस्थिती ही फारच बिकट होती. आजच्या युगामध्ये ही परिस्थिती पाहायला गेले तर खूपच वाईट आणि दयनीय अवस्था आहे असे मानायला काही हरकत नाही. कारण आज पाहायला गेले तर भारत हा देश विकसनशील देशात आहे.
ज्या काळात सध्या तरी लोकांनी परिस्थिती सुधारण्याचे काम चांगले प्रगतीपथावर चालू आहे. कारण खेड्या गावातील लोक आता शहराकडे निघाले आहे. कारण शहर भागात औद्योगिक वसाहती निर्माण झाल्यामुळे खेड्या गावातील लोक हे शहराकडे कामासाठी जात आहे. ते काम करून ते आपली परिवाराची भूक भागवण्याची काम करत आहे. भारतामध्ये जवळपास शहराच्या ठिकाणी औद्योगिक वसाहती तयार केले आहे. यामधून भारतातील लोकांना रोजगार निर्माण होईल असा उद्देश भारत सरकारचा आहे.
या जगामध्ये भारत विकसनशील देश तयार झालेला आहे. भारत या देशाने चंद्रावर सुद्धा आपला ठसा निर्माण केलेला आहे. भारताने जुन्या गावांची परिस्थिती ही सुदृढ एक नवीन गावी नवीन निर्माण केली आहे.
पूर्वीचे जुनी गावे आता नवीन गावांमध्ये रूपांतर झाले आहे. आता जुनी गावाची रूपांतर ही नवीन खेडेगावात झाली आहे. खेडेगाव हे शहराला जोडण्याची काम आणि जुने गाव सुद्धा विकसनशील झाली आहे.
भारतातील ग्रामविकास म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेने या गावाचा विकास करून घेतलेला आहे. जी पडकी घरी होती ती आता सिमेंट काँक्रेट ची निर्माण झाली आहे म्हणजेच जुने गाव हे आता तेथील ग्रामपंचायतीने विकसित केलेले आहे.
हळूहळू भारतातील प्रत्येक जुने गाव विकसित होण्याच्या मार्गाकडे निघाले आहे. जुन्या गावाची रूपांतर आता नवीन गावांमध्ये झाले आहे. ती रूपांतर करण्यासाठी भारत सरकारने पंचायत राज व्यवस्थेला वाटेल ते निधी उपलब्ध करून देण्याची काम राज्य सरकारच्या अधीन दिले आहे. तू निधी जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायत पर्यंत पोहोचण्याची काम ही युद्ध पातळीवर चालू आहे जुन्या गावची परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने हे पाऊल जनतेच्या कल्याणासाठी निवडले आहे किंवा उचलले आहे.
आता जवळपास भारतामध्ये पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आता या भारतात म्हणजेच विकसित भारतात खेड्या गावाची रूपांतर शहरी गावांमध्ये झालेले आहे.
भारताची एकंदरीत परिस्थिती ही नवीन गावामध्ये आणि जुने गावाची खेडेगावामध्ये आणि खेड्या गावाची शहरीकरणांमध्ये रूपांतरीत झालेले आहे. जुनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनाने वेळोवेळी खेडेगावासाठी निधी उपलब्ध करून देण्याची काम केले आहे. जगाच्या पाठीवर भारताने विकासाच्या दिशेने म्हणजेच प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. भारताची नवीन युगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारत हा विकसनशील देश झालेला आहे.