बुधवार, १७ जुलै, २०२४

असा सोहळा जो तूम्ही या जगात कदी पाहीलेलाच नाही/विठू माऊली चा सोहळा/महाराष्ट्राची जूनी परंपरा

 आपल्या महाराष्ट्राला पूर्वीपासूनच जुनी परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा म्हणजे, विठू माऊलीचा सोहळा संतांनी लिहून ठेवलेले आहे. अभंग द्वारे आपली संस्कृती ही मराठी संस्कृती आहे. आणि ती जोपासण्याची काम संतांनी पूर्वीपासून केले आहे. आणि त्यात संत ज्ञानेश्वरांनी चालू केलेला सोहळा आता सुद्धा पूर्वीची परंपरा या आधुनिक महाराष्ट्रात चालू आहे. 



श्रीक्षेत्र पंढरपूरया गावी विठुरायांनी आपले आगमन फार पूर्वीपासून केली आहे. त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी विठुरायावर अनेक अभंग व समाजाला संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी अभंग मार्फत जगाला व समाजाला उद्देशीत केले आहे.


प्रत्येक साधू संतांची या पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला जगातील सर्वात मोठा सोहळा भरवल्या जातो. आणि हा सोहळा पूर्वीपासून चालू आहे.


या सोहळ्याबद्दल आपण आता थोडी माहिती पाहूया, हा सोहळा पंढरपूर नगरीत कशा पद्धतीने भरवल्या जातो.

विठू माऊली चा सोहळा
विठू माऊली चा सोहळा


महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकाराम महाराजापर्यंत व जवळपास महाराष्ट्रातील सगळ्या साधू संतांनी पंढरपूर नगरीत विठुरायाची दर्शनाची आस धरलेली होती.


आणि पांडुरंगाने महाराष्ट्रातील साधुसंतांना साक्षात दर्शनी ही दिलेली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या अगोदर म्हणजेच पंधरा दिवस अगोदर देहू ,आळंदी या ठिकाणी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली या पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान होतात. बरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी या पालखीची आगमन पंढरपूरला होते.


या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये महाराष्ट्रातील लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सामील होतात. माऊलीच्या पालखीचे फार जुन्या काळात सुद्धा ही पालखी पंढरपूर वारी करत आलेली आहे.


संत ज्ञानेश्वरापासून ही पालखी आपली परंपरा आहे आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे नेण्याची काम पूर्वीपासून चालू ठेवलेली आहे.

जगामध्ये असा कोणता सोहळा नाही तो माझ्या विठू माऊलीची बरोबरी करेल. आणि असा सोहळा कुठेही भरू शकत नाही. पिढ्यान पिढ्या चालू असलेली ही जुनी परंपरा ही अशी चालू राहणार आहे. जगापुढे एक आदर्श म्हणून माझ्या विठू माऊलीचा सोहळा असाच माझा वारकरी दरवर्षी या सोहळ्यासाठी जेवढे काही मागे असलेला प्रपंच सोडून या सोहळ्यामध्ये सामील होतो फक्त आणि फक्त या विठू नाम गजरासाठीच जातो.


पंढरपूर नगरीमध्ये माझ्या विठू रायाची दर्शन घेण्यासाठी पंधरा दिवस पायी चालत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मधील जाऊन हळूहळू पूर्ण रस्ता स्वतःच्या पायाने चालत पंढरपूरच्या नगरीत त्याची आषाढी वारीसाठी आगमन होते. आणि तिथे तो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतो. आणि त्याला किती फार मोठी समाधान मिळलते.


आणि पौर्णिमेला हा वारकरी आपल्या आपल्या पालखीसोबत गावाकडे निघतो. जुनी परंपरा चालू ठेवून तो आपल्या पालखीत सामील होऊन परत पुन्हा आपल्या गावाकडे निघतो.



वारकरी संप्रदाय हा एक विठुरायाचा भक्त मानल्या गेलेला आहे महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला व रुक्मिणी देवीला नतमस्तक होऊन आपले सर्वस्व या पंढरपूर नगरीत अर्पण केले आहे.


महाराष्ट्रातील पंढरपुराकडी आषाढी वारीच्या दिवशी लाखो भक्तजन या पंढरपूर वारीत सामील होतात. आणि बऱ्या जिल्ह्यामध्ये पंढरपुराकडे जाण्यासाठी लोक आपल्या आपल्या सोयीनुसार पंढरपुरात दाखल होतात. जगातील एकमेव असा हा पंढरपुरातील जुनी परंपरा अजून सुद्धा चालू आहे. अतिशय शिस्तबद्ध चालू असलेला सोहळा माझ्या विठू राया आणि माऊलीचा सोहळा हा वारकरी संप्रदाय झपत आलेला आहे.


या पृथ्वीवर असा एकही सोहळा नाही जो, माझ्या विठुरायाच्या पंढरपुराची बरोबरी करू शकेल. महाराष्ट्रातील लांब लांबून लोक या पंढरपूर नगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी येतात.
आणि येथील नागरिकांनी या पंढरपूरच्या वारीत अतिशय वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा निर्माण करून ठेवलेले आहे.



आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून व बाहेरील प्रदेशातून दर्शनासाठी वारकरी येत असतो. त्यासाठी महाराष्ट्र शासन यांचे जाण्याची सोयीसाठी एसटी महामंडळ 24 तास यांच्या सेवेत हजर असते.


ज्ञानेश्वर माऊली आपली पालखी पंढरपुराकडे घेऊन आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील लाखो वारकरी संप्रदाय या पालखीमध्ये सहभागी होतो. या पालखीमध्ये ना कुठला भेदभाव ना कुठली जात ना कुठला धर्म सर्व धर्माची लोक या पार्टीमध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरकडे जातात.


जवळपास ही पालखी पंधरा दिवस पंढरपूरला जाण्यासाठी तेवढा वेळ लागतो. पंधरा दिवस ही पालखी पायी चालत जाते. या पालखीमध्ये सर्वस्व काही हरिनामाच्या भजनामध्ये वारकरी संप्रदाय दंग होतो.


महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने पंढरपुराकडे माऊलीच्या पालखीची प्रस्थान होते. आणि ही पालखी हळूहळू पंधरा दिवस पंढरपुराची अंतर पार करते. या पालखीमध्ये वयोवृद्ध व तरुण मंडळी सहभागी होतात आणि टाळ , मृदुंग वाजवत पंढरपूरच्या दिशेने रवाना होता.

आता आपण ,संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याकडे वळणार आहोत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याकडे

         संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याकडे



संत तुकाराम महाराज हे एक पांडुरंगाचे फार मोठे भक्त होऊन गेले आहे. आणि संत तुकाराम महाराजांना साक्षात पांडुरंगाची दर्शन सुद्धा दिली आहे. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु चि पदवी सुद्धा दिलेली आहे.

संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू मध्ये झालेला होता. आणि त्यांना लहानपणापासून पांडुरंगाच्या भक्तीची वेड लागलेली होते. त्यांनी या जगाच्या कल्याणासाठी अनेक अभंग लिहून ठेवलेले आहे ते आजही या जगाच्या कल्याणासाठी वापरल्या जाते.


संत तुकाराम महाराजांची पालखी देहू या ठिकाणाहून पंढरपुराकडे जाते. या पालखीमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय मोठ्या लाखोच्या संख्येने देहू या गावी दाखल होतात.


आणि ही पालखी पंढरपूरच्या दिशेने जाण्याची काम करते. या पालखीमध्ये या वारकऱ्यांसाठी संपूर्ण जीवनाची राहण्याची सोय केली जाते. या पालखीची वैशिष्ट्य अशी आहे की, या पालखीमध्ये तरुण वर्ग वृद्ध ,महिला सहभागी होतात. आणि ही पालखी मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या दिशेने चालत जाते.


ही पालखी पंढरपूरकडे जात असताना, या पालखीची बरेच मुक्काम होतात. आणि या पालखीचा आनंद फारच वेगळा आहे. आणि आषाढी वारीच्या दिवशीही पालखी पंढरपुरात दाखल होती. तेथे महाराष्ट्रत घरातून येणाऱ्या पालख्या आषाढी वारीच्या दिवशी एका ठिकाणी गोळा होतात.


आणि मग तिथे रंगतो वारकरी संप्रदायाचा सोहळा आणि तिथे विठू नामाचा जयघोष केला जातो. पंढरपुरात महाराष्ट्रातून येणाऱ्या पालकांची शिस्तीबद्ध सोय येथील प्रशासनाने निर्माण केली आहे.


या पंढरपूर नगरी महाराष्ट्रातून लांब लांबून लोक गोळा होतात. आणि शिस्तबद्ध दर्शनासाठी रांगा लावतात. आणि दर्शन झाल्याच्या नंतर येथे महाप्रसादाची सोय सुद्धा केलेली आहे.

महाप्रसाद घेऊन हा वारकरी संप्रदाय दुसऱ्या दिवशी आपल्या घराकडे जाण्यासाठी आतुरतेने एसटी महामंडळाची वाट बघते.


कारण पंधरा दिवसापासून चालत आलेला वारकरी हा विठुरायाची दर्शनी घेऊन आपल्या घराची वाट धरतो. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील पूर्वीपासून आणि फार जुनी परंपरा आजपर्यंत चालू आहे. माऊलीच्या पालखीची दर्शन घेण्यासाठी लोक लांबून येऊन तेथे मुक्कामाला थांबतात आणि दर्शन झाल्यानंतर आपल्या गावाकडे परत जातात.

महाराष्ट्रात आषाढी वारीच्या दिवशी एक मोठा उपवास धरल्या जातो. या उपासाला कंद ,मुळे खाऊन हा उपवास पार पाडला जातो. महाराष्ट्र मध्ये सर्व जनतेने पांडुरंगाची गावागावात पालखीचे आयोजन केलेले जाते.


जुनी परंपरा या आधुनिक महाराष्ट्रात चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी या जगाला पसायदानामार्फत उद्देशून सांगितलेले आहे. या जगाच्या कल्याणासाठी या संत महात्मा लोकांनी लिहून ठेवलेले आहे ते आजही येथील महाराष्ट्रातील जनता स्मरणात ठेवलेले आहे.

पंढरपूर नगरी




 


रविवार, १४ जुलै, २०२४

An exercise to Strengthen the Agriculture of Indian old villages/भारतीय जुनी गावांची ,शेती कसवण्याची, कसरत

 भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. भारताचा जवळपास ,70 टक्के लोक  शेतीवर अवलंबून आहे. भारत देशा पूर्वीपासून शेती, ची कला अवगत केलेली आहे. 

भारतामध्ये पूर्वीची शेती, ही कसवण्याची पद्धत थोडी वेगळी होती. आता मात्र या आधुनिक भारतात अनेक अशा तंत्रज्ञानाने आधुनिक शेती तयार करण्यासाठी व बळकावण्यासाठी यंत्र शासनाने म्हणजेच भारत सरकारने विकसित शेतकऱ्यांसाठी करून दिले आहे. 


शेती म्हटलं तर, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक व्यवसाय भारतामध्ये मानला जातो. शेतीही उत्कृष्ट दर्जाची करण्यासाठी याला खूप मेहनत घ्यावी लागते. 


भारतीय शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या शेतीचा वारसा कायम ठेवून देशासाठी योगदान दिले आहे. आणि यापुढे सुद्धा शेतकरी हा देशासाठी योगदान देत राहील, शेतकरी हा देशाचा, कणा मानला जातो. कारण शेतीशिवाय देशाची प्रगती होणार नाही शेतकरी जर जगला तर देश जगेल.


आता आपण भारतातील पूर्वीचे शेतकरी व त्यांची शेती करण्याची पद्धत आणि शेतकऱ्यांची जी काही शेती करण्यासाठी लागणारे साहित्य, आणि त्यांची जुनी गाव हे कसे गट शेती या गावाच्या माध्यमातून जुनी गावी विकसित झाली आहे ते आता आपण बघणार आहोत.


पूर्वीचे जुने शेतकरी व त्यांची गाव व शेती करण्याची पद्धत कशी आहे? 

Agriculture of Indian old villages
भारतीय जुनी गावांची ,शेती कसवण्याची, कसरत


पूर्वी भारतामध्ये पाहिजे तेवढी विकसनशील तंत्रज्ञान नव्हते. कारण पूर्वी भारतामध्ये शेती करण्यासाठी लाईट म्हणजेच, इलेक्ट्रिक सप्लाय नव्हता, त्यामुळे पूर्वीच्या शेतकऱ्यांना खूपच अडचणींचां सामना करावा लागेत, पूर्वी काळी भारतीय शेतकरी हा शेती करण्यासाठी त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याने तो एका कौशल्याने शेती करायचा, आणि त्यातून त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागवायचा आणि शेती करण्यासाठी त्यांच्याकडे विकसित असे एखाद तंत्र नसल्याने खूपच अडचणीचा सामना करावा लागत होता. 


पूर्वीचे गाव हे एका नदीच्या काठावरती बसायची व तेथे वास्तव्य निर्माण करायची आणि शेती करण्यासाठी या नदीच्या काठावर आपली जमीन पिकवण्याचे काम करतात. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना या नदीच्या काठावर शेती करण्याचा फायदा म्हणजे, शेती पिकाला पाणी देण्यासाठी या नदीचा फार मोठा उपयोग होण्यास मदत होण्याची. त्यानंतर त्याला या नदीचा फायदा म्हणजे, या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी या नदीचा सुद्धा फायदा खूपच महत्त्वाचा होता. शेतकऱ्यांनी आपली शेती चालवण्यासाठी कोणतीही विकसित तंत्रज्ञान नव्हते तरीही शेती कसरत करून पिकवण्याची काम या शेतकऱ्यांनी करून दाखवलेली आहे. 


पूर्वीच्या शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे तंत्रज्ञान नसल्याने त्यांना खूपच अडचणीचा सामना करावा लागत असे. आणि त्या पिकाला रासायनिक खतांचा वापर होत, नसल्याने त्यांना येणारे उत्पन्न हे फारच कमी निघत असत. कारण या पिकांना जर रासायनिक खत नसल्याने त्यांच्या उत्पन्नात फार मोठी घट येत होती.

 
भारतामध्ये पूर्वी शेतकऱ्यांची फारच बिकट अवस्था होती. या बिकट अवस्थेत सुद्धा भारतीय शेतकरी हाआपली शेती ही स्वतःच्या मेहनतीवर चालवत असत. 


शेतकऱ्यांनी देशासाठी हे योगदान शेती करून देशाची उपजीविका भागवण्याची काम आजही ते करतात. पूर्वी नदीच्या काठावरती त्यांनी आपली शेती कसरत चालू ठेवली आणि पूर्वी सुद्धा देशाची उत्पन्न वाढवण्याचे काम भारतीय शेतकऱ्यांनी केली आहे.
 

पूर्वीच्या जुने गाव हे सामूहिक गट शेती करत असे, कारण त्या शेतकऱ्यांना गटशेती केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध नसायचा कारण गट शेतीमुळे त्यांच्याकडे जास्त संख्या बळ निर्माण झाल्याने त्यांची शेती ही कसवण्यासाठी सोपी आणि सरळ जायचि. आता आधुनिक भारतात शेती करणे फारच सोपे झाले आहे. कारण पूर्वीच्या शेतकऱ्यांमध्ये आणि आताच्या शेतकऱ्यांमध्ये फारच मोठा बदल झालेला दिसून येत आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांसाठी कोणतेही विकसित तंत्रज्ञान नसल्याने त्यांना शेती करणे फारच अवघड जायचे, परंतु आता भारत सरकारने तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे आताच्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी खूप मोठी मदत शासन करत आहे. आणि पूर्वी शेती करण्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागत होती. मात्र आता ती मेहनत यंत्राच्या साह्याने कमी पडत झाली आहे.

 
पूर्वी शेतकरी हा नदीच्या काठावर शेती फसवण्याची काम करत होता मात्र हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल घडत गेले आहे. ते बदल म्हणजे, त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये विहीर कालवा खोदून त्याची पाणी आपल्या पिकाला देण्याचे काम करत होते. विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी जनावराच्या साह्याने मोठा आणण्याची काम त्यांनी त्या काळात केली आहे आणि शेत पिकवण्याची उत्कृष्ट काम त्या काळामध्ये पार पाडले आहे. 



पूर्वी भारतामध्ये शेतीसाठी, पाणी देण्यास विहिरीतून पाणी कोणत्या तंत्रज्ञानाने बाहेर काढले जाते?

                     पूर्वी भारतामध्ये शेतीसाठी,पाणी देण्याचे तंत्रज्ञान




पूर्वी काळी शेतकरी आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीतून पाणी काढण्याची टेक्नॉलॉजी ही जनावराच्या साह्याने[ मोठा] च्या साह्याने पाणी बाहेर काढून एका दांडा सारखी ओढा निर्माण करून पिकापर्यंत ते पाणी पोहोचत असत. कारण त्या काळात इलेक्ट्रिक पंप उपलब्ध नसल्याने ते लोक हा पर्याय निवडत होते. मोठा आणण्यासाठी जनावराचा उपयोग त्या काळामध्ये केला जात असे. आणि विहिरीतून बाहेर पाणी आपल्या पिकापर्यंत एका नाल्याच्या साह्याने ते पाणी जात असे आणि त्या पाण्याची नीट पिकापर्यंत विल्हेवाट लावायचे काम ते शेतकरी व आपली शेती करण्याची मेहनत घेत असे. भारतामध्ये पूर्वी इलेक्ट्रिक पंप उपलब्ध व कोणतेही तंत्रज्ञान, त्याबद्दल माहीत नसल्याने त्या काळातील शेतकरी हा पर्याय फारच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत होता.
 
नंतर हळूहळू शेतकऱ्यांची प्रगती होत चालली आणि त्यांना शेतीबद्दल बरीचशी माहिती मिळू लागली आणि शेतकरी सुद्धा एक विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करू लागला. सध्याच्या आधुनिक भारतात शेतकरी हा तंत्रज्ञानाने गुणसंपन्न असल्याने आता शेतामध्ये पाईपलाईनची व्यवस्था या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतापर्यंत पाणी नेण्याची काम या पाईप लावून द्वारे करण्यात येते आणि इलेक्ट्रिक पंप उपलब्ध असल्याने या पाईपलाईन द्वारे कुठेही आणि कोणत्याही शेतात पाणी नेण्याची काम सोपे झालेले आहे. 



भारतीय शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या शेतीची दयनीय अवस्था काय होती?




पूर्वीच्या शेतकऱ्यांची फारच देणे अवस्था होण्याची कारण म्हणजे विकसनशीत तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने त्यांना शेती करण्यासाठी फारच मेहनत घ्यावी लागत असे. कारण आताच्या विकसित भारतात शेती करणे फार सोपी आहे .पण पूर्वीच्या शेतकऱ्यांसाठी शेती करणे फारच अवघड गेली आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाहिजे तेवढे बी बियाणे विकसनशील म्हणजे तंत्रज्ञान व बियाण्यांचा प्रकार त्यांना विकसित नसल्याने त्यांना पाहिजे तेवढी उत्पन्न मिळत नव्हते. कारण बियाणी ही उत्कृष्ट दर्जाची असल्यावर शेतकऱ्यांची उत्पन्न हे दुप्पटीने वाढण्याची शक्यता असते. कारण त्यावेळेस ,गहू हे पीक घेण्यासाठी त्याबद्दल माहीत नसल्याने खूपच कठीण होते. भारतामध्ये पूर्वी दुष्काळ पडला असल्याने म्हणजेच जवळपास 1972 मध्ये भारतावर दुष्काळाची सावट असल्याने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते. आणि त्या काळात खाण्यासाठी अन्नधान्याचा तुटवडा आल्यामुळे शेतकऱ्यांची फारच मोठी दयनीय अवस्था झाली होती. आणि गव्हाचे उत्पादन घटले असल्याने देशावर फार मोठी संकट निर्माण झाली होते.


आणि भारत देशा गरिबीकडे जाण्याच्या मार्गावर होता. परंतु काही राष्ट्रांनी भारताला सहकार्य करून अन्नधान्याचा पुरवठा करून दिला,भारतातील  आणि तेथील जनतेला अन्नधान्य पुरवण्याची काम भारत सरकारने केले त्यामध्ये खाण्यासाठी जनतेला जव गहू निर्माण करून दिले. त्यानंतर भारताची परिस्थिती हळूहळू सुधारत चालली होती चांगला पाणी पाऊस व चांगले उत्पन्न घेण्यासाठी भारताने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचे काम चालू केले आणि भारताचे उत्पन्न वाढत चालले होते. 


त्यानंतर पूर्वी शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा पाठिंबा घेण्याची काम चालू केली आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी योजनेचा एक असा पर्याय शेतकऱ्यांकडे ठेवला की इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी त्यांना खूप मोठे मदत करण्याची काम शासनाने केली आहे


पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी खूप मोठे अवघड परिस्थितीतून वाट काढावी लागत होती आणि आता शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत लाईट ही 24 तास दिल्या जाते. आणि त्यांची वीज बिल सुद्धा माफ केल्या जाते. पूर्वी शेतकऱ्यांसाठी अशी महत्त्वपूर्ण योजना नव्हती त्यामुळे पूर्वीचे शेतकरी हा खूप अडचणीत सापडत असे. आता मात्र शेतकरी हा सुजलम सुफलम झालेला आहे. 


पूर्वीचा शेतकरी हा उत्पन्नाच्या बाबतीत खूपच मागे पडलेला होता. मात्र शेती पिकवण्यासाठी त्याला कसरतीचे काम करावे लागत ,आता मात्र तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजेच त्याला ट्रॅक्टरने शेती करणे सोपी जात आहे. पूर्वी त्याला जनावराच्या साह्याने शेती करण्यासाठी नागर हा हकलावा लागत असे आणि शेती करावी लागत होती. जनावरांना नागराला धरून नागाटी करण्यात येत असत. जवळपास एका एकराला नागाटी करण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवसाचा वेळ लागत होता. दोन ते तीन दिवस जनावराच्या साह्याने तू नागाटी करून घेत होता. त्यामुळे त्यांची खूपच हाल होत होते. आणि शेती करणे म्हणजे पूर्वीच्या काळात खूपच अवघड जायची. आता मात्र आधुनिक जगात ट्रॅक्टरने शेती केली जात आहे.
 

भारतीय शेतकरी हा आजही भारताचा पोशिंदार आहे. पूर्वीपासून त्यांनी देशाला अन्नधान्य पुरवठा करण्याचे काम सतत केले आहे. आणि भारताला एका प्रगतीच्या दिशेने नेण्याची काम सुद्धा भारतीय शेतकऱ्यांनी केली आहे.
 

जुने शेतकऱ्यांचे गाव हे, कशी असते?



जुना शेतकरी पूर्वी एका नदीच्या काठावरती त्याची घरटे बनवून व शेती सुद्धा त्याची एका नदीच्या काठावरती असायची आणि राहायला साधी राहणीमान आणि गवताची झोपडी आणि जनावराच्या साह्याने शेती करण्याचे काम पूर्वीचे शेतकरी करत असत. पूर्वीचे शेतकरी शेतीही गावाच्या शेजारील बाजूला जास्त प्रमाणात करत असत. कारण गावाच्या शेजारीत बाजूस वन्यप्राणी यांच्या पिकाची नासधूस कमी प्रमाणात होत होती म्हणून पूर्वीचे शेतकरी हे गावालगतच्या भागात शेती करण्याची काम करत होते. कारण जर गावापासून दूर शेती केली असता, वन्यप्राणी शेतीला फार मोठे नुकसान देण्याची काम करत होते. म्हणून शेतकऱ्यांनी गावा नदीच्या भागात शेती करण्याची काम केली आहे.


An exercise to Strengthen the Agriculture of Indian old villages



शनिवार, १३ जुलै, २०२४

भारतातील जुन्या गावांच्या चाली, रीती, रिवाज, आणि संस्कृती, राहणीमान/भारतातील जुन्या गावांची पद्धतशीर माहिती, जाणून घ्या

 भारतामध्ये जुन्या लोकांच्या चालीरीती राहणीमान हे आपण पूर्वीपासून पुस्तकामध्ये वाचत आले आहोत. आधुनिक जगाच्या राहणीमानात आणि पूर्वीच्या राहणीमान फार मोठा बदल आहे त्यांची संस्कृती सुद्धा वेगळी आहे. या आताची संस्कृती सुद्धा बदलली आहे. 



पूर्वी अशी संस्कृती होती की, ती संस्कृती खरोखरच भारतीय संस्कृती होती. मात्र आता ती संस्कृती मोडीत चालली आहे. ती संस्कृती जपून ठेवण्यासाठी आपण आता जगाला आपल्या भारतीय संस्कृती बद्दल, सांगणार आहोत. 


भारतामध्ये या जगात म्हणजेच आताच्या आधुनिक जगात फार मोठा बदल झालेला आहे. त्या काळामध्ये भारतात जुन्या चाली व जुने ,सन आणि रीती रिवाज थोड्य वेगळ्या आहेत.


जगामध्ये पाहिले तर भारताची संस्कृती ही एक उत्कृष्ट संस्कृती पाहिल्यापासून चालत आलेली आहे. देशामध्ये भारतात अनेक महाराजे होऊन गेली आहे. आणि अनेक संत महंत होऊन गेली आहे. त्यामुळे त्या काळातील संस्कृती थोडी वेगळी होती. पण आता ती हळूहळू थोडी बदलत चाललेली आहे. 



भारतातील पूर्वीचि संस्कृती कशी होती, ती आता आपण बघणार आहोत. 

संस्कृती, राहणीमान
पूर्वी भारताची संस्कृती


पूर्वी भारताची संस्कृती ही एक उत्कृष्ट संस्कृती,पाहिल्यापासून चालत आलेली आहे. महा भारतापासून ते कलियुगापर्यंत चालू आहे. आजही भारतात आपल्या परंपरा सण जोपासली जाते. भारतामध्ये पुरुषांसाठी एक संस्कृती व महिलांसाठी अशी एक संस्कृती नाही कारण भारतामध्ये महिला आणि पुरुष भेदभाव केल्या जात नाही. पुरुषाबरोबर स्रियांचे तेवढेच महत्त्व दिले जाते. भारतामध्ये समारंभ किंवा एखादी कार्यक्रम असल्यास पुरुषा इतकीच महत्त्वाचे स्थान स्रीला दिले जाते. भारताची एक अनोखी व वर्षानुवर्षी चालत आलेली ही एक संस्कृती आहे. 


पूर्वीच्या काळातील भारतीय स्रियांचे राहणीमान कसे होते?

पूर्वीच्या काळातील भारतीय स्रियांचे राहणीमान एक संपूर्ण वस्त्र अंगावरती आणि नाकात एक भली मोठी रिंग कानात बाळ्या केस लांब आणि अंगावरती पूर्ण वस्त्र असे एक पूर्वीच्या स्त्रीची राहणीमान होते. काही स्त्रियांकडे आपण त्याला त्यांच्या भाषेत साडी किंवा लुगडं, पातळ नाटी व काही विशेष असे वस्त्र त्यावेळेस होते. भारतातील महिला नेहमी पूर्ण कपाळावर कुंकू लावायच्या आणि त्याच्या थोडी कपाळाच्या खाली हळदीचा थोडेसे एक थेंब लावायचा. त्यामुळे भारतीय नारी व तिच्या अंगावरील वस्त्र एकदम उठून दिसायचे पूर्वी स्त्रियांसाठी विशेष असे वस्त्र होती. ती वस्त्र राजांच्या महाराणा यांच्याकडे असायची आणि ते वस्त्र फक्त राजांच्या महाराणासाठीच हसायचे त्याला कोणतीही सामान्य बाई धारण करू शकत नव्हती, पूर्वीच्या वस्त्रामध्ये अनेक अशी पारंपारिक गुण होते. कारण ते वस्त्र सुती असायची आणि पोशाख बायांच्या अंगावरती खूपच उठून दिसायचं त्यामुळे भारतीय नारी ही एक भारतासाठी म्हणजेच मनुष्यासाठी लक्ष्मीचे रूप आहे.

पूर्वीच्या काळातील भारतीय स्त्रीची राहणीमान कसे होते?

                               पूर्वीच्या काळातील भारतीय स्री

पूर्वीच्या महाराजा पासून ते कलियुगापर्यंत ही संस्कृती चालू आहे. पूर्वीसुद्धा महिला ना तेवढेच महत्त्व होते. अनेक ग्रंथात लिहून ठेवलेली आहे की स्री जगतजींनी आहे .तिला मातेसमान मानले जाते. पूर्वी स्री आणि पुरुष एक समान वागणूक दिली जात नव्हती पण तो काळ कमी प्रमाणात म्हणजेच त्या काळात स्त्रीला महत्त्व दिले जात नव्हते. आणि पण एकेकाळी स्रीला महत्त्व आली आहे. काही  राज्यांनी  महत्त्वाची मानले आहे कारण ती या जगाची जगत, जननी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे.


जगामध्ये भारत अस देश आहे की, स्रीला महत्त्वाचे स्थान आता दिले आहे. पूर्वीपेक्षा आता जास्त महत्त्वाची मानली जाते. पूर्वीच्या काळात स्त्री ला जास्त फार काही संस्कृतीची जाण नव्हती कारण एका बाईसाठी फार मोठे महत्त्व दिले जात नव्हती कारण मनुष्याने एक महत्त्वाचे करून ठेवले होते की आपल्या पुढल्या पिढीसाठी आपल्याला एक वंशाचा दिवा म्हणजेच मुलगा हा महत्त्वाचा त्यावेळेस होता. आणि बाईसाठी म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीला काहीही महत्त्व दिले जात नव्हती तिला फक्त चूल आणि मुल हे दोन कामे तिच्याकडे व घरातील कामे तिच्याकडे होती. कारण तिला बाकीच्या कारभारात लक्ष दिल्या जात नव्हती आणि नीट वागणूक सुद्धा दिली जात नव्हती. बाईसाठी फारच वाईट वागणूक दिली जात होती. भारतामध्ये ज्या बाईचा नवरा वारलेला असेल किंवा मयत झालेला असेल त्या बाईला तिच्या नवऱ्यासोबत सती जाण्याची प्रथा होती. मात्र एकेकाळी भारतामध्ये काही समाज सुधारकांनी ही प्रथा मोडीस काढली म्हणजेच , त्या काळात ब्रिटिशांचे भारतावर राज्य होते. त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने या सतीबंदी कायदा करून स्त्रियांसाठी खूप मोठे मोलाची योगदान दिले आहे आणि ज्या समाजसुधरकांनी हे योगदान खूपच आपले सर्वस्व लावून दिले आहे. 


पूर्वी स्त्रियांना फक्त घरातील काम करण्याची व बाहेरील काम हे पुरुष करत असत. आणि आता मात्र या आधुनिक जगात बाई शिवाय मनुष्याची पानही हालत नाही, कारण कोणतीही विधी परंपरा व सण समारंभ कार्यक्रम असला तर पुरुषाबरोबर श्री महत्त्वाची असते. पूर्वी एकेकाळी श्री ला कोणत्याही समारंभात जाऊ दिल्या जात नव्हती कारण स्त्रियांची सावली सुद्धा या समारंभावर व कार्यक्रमावर पडू देत नव्हती. पूर्वीचे जे नियम होते ते आता मोडकळीस निघालेले आहे. पूर्वीच्या स्त्रिया आणि आताच्या बघितल्या तर फार मोठा फरक आहे. 


भारतातील पूर्वीचे मनुष्यांची राहणीमान! 

पूर्वी भारतातील मनुष्य म्हणजेच जुन्या काळातील मानव वस्त्र खूपच छान होते. आणि भारतीय संस्कृतीला धरून होती. कारण त्यावेळेस पॅन्ट ,शर्ट नव्हती फक्त धोतर जोडा, टोपी अशी वस्त्र मनुष्याची होते. मनुष्यासाठी अनेक प्रकारचा प्रकारची वस्त्र म्हणजेच त्याला मराठी भाषेत कापड असे सुद्धा म्हणतात. ही कापड पूर्वी वेगळ्या पद्धतीची असायची आणि मनुष्याने याला धारण केल्यावर एकदम उठून दिसायची पूर्वी महाराजांची वस्त्र थोडी वेगळी असायची आणि सामान्य माणसाची वस्त्र थोडी वेगळी असायची.

मध्यंतरी काळामध्ये असा एक काळ होऊन गेला आहे. की भारतामध्ये खूपच गरिबीची सावट असल्यामुळे, भारतीय लोकांना त्यांच्या अंगावरती नीट वस्त्रही सुद्धा नव्हती, कारण त्या काळामध्ये भारताची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने भारत देश गरिबीकडे फोडल्या गेल्या होता. कारण त्या अगोदरच्या काळात राजा महाराजांनी जेवढी काही राज्य स्थापित केले होते त्या राज्यावर इंग्रजांची सत्ता होती. आणि त्या काळामध्ये भारतीय लोकांची खूपच दूर अवस्था झाली होती. त्या काळात म्हणजेच ब्रिटिश सरकारच्या काळात खूपच गरिबी भारतीय मनुष्यावर आली होती.


भारतीय संस्कृती वस्त्रे हे महत्त्वाचे मानले जाते. कारण वस्त्रापासून प्रत्येक व्यक्तीची इज्जत राखली जाते. आणि मनुष्यासाठी अनेक वेगवेगळी वस्त्र आता या जगात निर्माण झाली आहे. भारताच्या संस्कृतीत अनोखी वस्त्र पूर्वीपासून आहे. पूर्वी सुती वस्त्र भारतीय लोक धारण करत होते. भारतामध्ये पूर्वी औद्योगीकरण नव्हते त्यामुळे वस्त्राच्या सूतगिरण्या नव्हत्या फक्त आणि फक्त इंग्रजांच्या काळामध्ये थोड्याफार का होईना सूतगिरण्या निर्माण झाल्या आणि इंग्रजांनी वस्त्र तयार करण्याचे काम चालू केली. 


जगामध्ये भारताची संस्कृती ही अनोखी आणि आगळीवेगळी होती भारतामध्ये संत महात्मा होऊन गेली त्यांनी सुद्धा संस्कृतीबद्दल ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. की भारताची राहणीमान ही एक उत्कृष्ट दर्जाची राहणीमान होते आणि भारत हा देश वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे या भारतातील सण समारंभ वेगळे प्रत्येक जातीची प्रत्येक धर्माची वेगळी आहेत. 


पूर्वीचे भारतीय सन ,समारंभ व कार्यक्रम कसा साजरी करायचा हे आता आपण पाहणार आहोत.



पूर्वी एखादा सण, समारंभ साजरा करायचा म्हटलं तर एका व दोन-चार घरे तयार होऊन तेथे एक मोठे मातीचे आणि छपराचे जुनी गाव तयार होण्याची आणि तेथे त्या गावाची लोकसंख्या एका जागेवर येऊन आणि ती विशिष्ट जागा बसायची त्या जागीच सन समारंभ पूर्ण गावकरी मंडळी पार पाडायची आणि आनंदाने आपले सणसमारंभ व आपली संस्कृती जपायची काम करते. पूर्वी एखादा सण जर साजरा करायचा असेल तर ,म्हणजेच आपण या काळात त्याला होळी असे म्हणतो आणि पूर्वी सुद्धा त्याला होळीच म्हणतात. तू जर सण साजरा करायचा असल्यास पूर्ण गाव एकत्र येऊन तो सण साजरा करतात. म्हणजेच तो जो असा सण आहे. की एका व्यक्तीकडून तसं साजरा केला जात नाही त्याला पूर्ण गावाचा पाठिंबा असणे आवश्यक असते. पूर्वीपासून म्हणजेच आपल्या राजापासून हा सण साजरा केला जातो. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सणाला महाराष्ट्रात सुरुवात केली आणि या सण म्हणजे सगळ्यांचा आवडता सण होता आता सुद्धा भारतामध्ये होळीला खूप महत्त्व दिले जाते. 


त्यापाठोपाठ भारतीय, संस्कृतीमध्ये दशरा हा सण फार महत्त्वाचा मानला जातो. कारण या सणाच्या दिवशी खूप मोठे प्रेम संबंध म्हणजेच व्यक्तीत समाजात भांडण असेल तर या सणाच्या दिवशी हे भांडणे संपुष्टात येतात वाद विवाद संपुष्टात येतात. भारतीय संस्कृतीत दसरा आसन पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि तीच परंपरा आता ही टिकून ठेवलेली आहे. कारण आपल्या भारतात प्रत्येक सणाला खूप महत्त्व दिले जाते.


या सणाला म्हणजेच दसऱ्याला दुसरे नाव, विजयादशमी सुद्धा म्हटले जाते. कारण या दिवशी महाभारताची फार मोठी योगदान आहे. पाच पांडवांनी या सणाच्या दिवशी आपट्याच्या झाडात आपली शस्त्र ठेवलेली होती. म्हणून या सणाच्या दिवशी प्रत्येक घरात भारतामध्ये आपापल्या वस्तूची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी वाताच्या आधुनिक जगात सुद्धा ही परंपरा भारतात चालू आहे. भारत समारंभांना महत्त्व दिले जाते. भारत हा देश सर्व धर्मीय देश आहे या भारतात प्रत्येक जात व प्रत्येक धर्म समान मानला जातो. 


पूर्वीच्या काळातील देवी देवतांची पूजा व भंडारा कसा होता? 

पूर्वी जिथे लोक वस्ती राहत होती तेथे एक देवी देवतांच मंदिर राहायची आणि पूर्वीची जुन्या गावात त्या गावातली लोक व तरुण मंडळी त्या मंदिरावर आपला भंडारा करायची आणि त्या भंडाऱ्याचा लोकांना खूपच आनंद वाटायचा. प्रत्येक गावात पूर्वी एक भंडारा दरवर्षी होतो. आणि त्या भंडार्यात त जेवणाचा कार्यक्रम ठेवल जातो. काही लोक एकत्रित येऊन हा भंडाऱचा कार्यक्रम पूर्ण पणे पार पाडत असेल. कारण जुनी परंपरा ही आता मोडकळी झाली आहे. महाराष्ट्र मध्ये हा भंडार्याचा कार्यक्रम पूर्वी असायची. या आधुनिक भारतात म्हणजेच भारतातील महाराष्ट्रात या भंडार्याच्या जास्त प्रमाणात ठेवल्या जातो. हा भंडारा पूर्वी गावातील लोकसंख्या व आजूबाजू गावातील लोकसंख्या पाहूनच ठेवल्या जातो. यामध्ये अन्नधान्य जास्त प्रमाणात लागते. या भंडार्यापासून गावा गावाची ओळख निर्माण होती. लोकांमध्ये भेटीगाठी होत राहत्या. हा भंडारा विशिष्ट म्हणजे एखाद्या गावातील धार्मिक ठिकाणी म्हणजे देवी देवता भंडारा असायचा आणि या भंडार्यासाठी बाहेर गावातील लोक जीवनासाठी व महाप्रसादासाठी यायची. या भंडार्याचा आनंद वेगळाच असायचा. या आधुनिक जगात ही पद्धत अजून सुद्धा काही गावांमध्ये चालू आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारपासून ही भंडाऱ्याची पद्धत आता सुद्धा काही गावांमध्ये चालू आहे.


भारतीय जुन्या काळातील लग्न समारंभ? 

भारतामध्ये जुन्या काळातील लग्न समारंभ हे मुलगा हा लहान असतात आणि मुलगी सुद्धा लहान असायची यामध्ये त्या दोघांचा विवाह करण्यात यायचा. याला बालविवाह सुद्धा म्हणतात. जुन्या काळात भारतामध्ये या बालविवाहाचे प्रमाण जास्त होते. कारण भारतात बालविवाह मोठ्या प्रमाणात साजरी करायची . आणि बालविवाह म्हणलं तर भारतामध्ये जास्त प्रमाणात पूर्वी होतात. हे समारंभ जास्त प्रमाणात होऊ लागल्यामुळे. भारतातील काही समाज सुधारक लोकांनी याला बंदी घालण्याचे काम केले. त्यावेळेस ब्रिटिशांचे राज्य होते. आणि त्या काळामध्ये काही समाज सुधारक लोकांनी याचा कायदा हाती घेतला आणि याला प्रतिबंध केले. आता मात्र मी भारतात याला फार मोठा कायदा निर्माण केला आहे. भारत सरकारने याच्यावर बंदी आणलेली आहे. बालविवाह साठी भारत सरकारने कठोर पावली उचललेली आहे. आणि याला आळा घालण्याची काम भारत सरकारने केली आहे. 



शुक्रवार, १२ जुलै, २०२४

Living conditions and lifestyles of India`s oldest villages/भारतातील सर्वात जुने गावांची ,राहणीमान आणि जीवन शैली /गावातील जगण्यची पद्धत/

 भारताची पूर्वीचे जुन्या गावाची राहणीमानाची शैली चा विचार केला तर ,खूपच कठीण परिस्थितीमध्ये या लोकांनी आपले जीवन हे जगले आहे.

Living conditions and lifestyles of India`s oldest villages

Living conditions and lifestyles of India`s oldest villages

भारतामध्ये पूर्वी काळी जवळपास पाच पिढी अगोदरचे जिवन जर बघायला गेलो तर, त्या काळातील लोकांची गाणी खूप साधी भोळे होते. कारण त्या काळात कोणत्याही सुख सुविधा नव्हत्या कारण या काळात प्रत्येक लोकांची आर्थिक परिस्थिती ही बिकट होती. 


कोणतेही जुने गाव म्हटले तर, हे जुने गाव पूर्वी नदीच्या काठावर बसलेले असायचे कारण या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी त्या नदीचा उपयोग होण्याचा आणि त्यापाठपाठ हे नदीचे पाणी त्या गावातील शेतकरी शेतीसाठी उपयोग करायचे आणि त्यातून आपली शेतीच्या उत्पन्ना आपली परिवाराची उपजीविका भागवण्याचे काम करत असत. 


जुन्या गावाची परिस्थिती पूर्वी खूपच बिकट परिस्थितीची असल्यामुळे येथील लोकांची जीवन खूपच अवघड असतात. पूर्वी जुन्या गावात राहण्याची चांगल्या प्रकारे साधन म्हणजे राहण्यासाठी घरटे नसायचं कच्च्या मातीची घरटे आणि गवताची छ*** असायची. 


जुन्या गावात शहरासारखी शाळा कॉलेज नव्हती कारण जुने गाव ही अत्यंत अति दुर्गम भागात बसलेले बसायचे. जुनी परिस्थिती वाईट असायची. भारतात असे अनेक खेडेगाव आहे आजपर्यंत त्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा निर्माण झालेली नाही. येथील जीवन प्रवास असायचा आणि लोकांची राह ण्याची पद्धत अनोखी वेगळी असायची कारण जुने गाव ही निर्मिती दोन-चार लोकांपासून दोन-चार घरापर्यंत आणि दोन-चार घरापासून 50 घरापर्यंत व 50 घरापासून शंभर घरापर्यंत असायची.


भारतीय संस्कृती खेडेगाव आहेत. त्या लोकांना दळणवळणाच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हत्या कारण भारतातील जुने गाव , हे दगडामध्ये बांधलेली असायची त्या काळात मातीमध्ये, घरे बांधायची आणि मनुष्य आपले जीवन त्या घरामध्ये आयुष्य काढायचे, त्यांच्या खाण्याची व जेवणाची सोय म्हटल्यावर त्यांना जंगली भाज्या जास्त आवडायच्या भारतातील पूर्वीचे लोक जंगली भाज्या व जंगली फळे जास्त प्रमाणात खाऊन टाकायची म्हणजेच त्यांची शरीर निरोगी राहत होते. 

भारतातील सर्वात जुने गावांची ,राहणीमान आणि जीवन शैली


जंगलातील कंदमुळे खाऊन जीवनाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणताही आजार कोणताही रोग होत नव्हता. त्याचपाठोपाठ त्यांना पाण्याची सोय म्हणजे नदी तलाव या ठिकाणी पाण्याची सोय होयाची तिथून ती पाणी प्यायची आणि आपली जीवन चालू ठेवायचे.


भारत देशाची एकंदरीत जुन्या गावाची परिस्थिती पाहता, त्या काळात फार वाईट दिवस त्या लोकांनी काढले आहे. पूर्वी कोणतेही तंत्रज्ञान विकसित नव्हते. तरी पण ते लोक पूर्वी थोडीफार शेती व्यवसाय करायचे आणि त्यातून आपल्या परिवाराची जीवन हे चालू ठेवायचे. 


जुन्या गावांची परिस्थिती व त्यांचे राहणीमान कसे असायचे हे आपण आता पाहणार आहोत. 

भारतातील सर्वात जुने गावां



जुने गाव म्हटले तर त्या गावात मातीचे घरी असायचे ना कुठे सिमेंटची घरी नसायचे कारण कोणत्याही विकसित सुविधा नसायच्या त्यामुळे त्या लोकांना जगणे फारच कठीण गेले. जुनी परिस्थिती पाहता, अंगावर त्यांच्या कमी वस्त्र म्हणजेच कपडे नसायचे कारण पैसा मुबलक नसल्यामुळे ती आपल्या परिवारासाठी कोणतेही वस्त्र खरेदी करू शकत नसतील . परिवाराची भूभागवण्यासाठी वाटेल तेथे भटकंती करायची आणि जंगलातून कंदमुळे भाजीपाला यासारख्या बऱ्याच गोष्टी ते घेऊन घराकडे म्हणजेच गावाकडे निघायचे. 

त्या काळातील अन्नधान्यासाठी कमी प्रमाणात धान्य पिकवत असे, त्या धान्यातून त्यांच्या परिवाराची भूक भागवत असत. आणि जगण्यासाठी वाटेल ते काम करायचे आणि परिवारासाठी संध्याकाळी घराकडे जायचे.

खेड्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, खूपच बिकट आणि हालाखीची असते. कारण खेड्यामध्ये दळणवळणाच्या व इंटरनेटच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध राहत नाही. पूर्वीच्या जुन्या गावांच्या आठवणी व वाचनेतून लक्षात असे येते की, भारतातील जेवढे काही पूर्वी चे जुने गाव हे अति बिकट परिस्थितीत दिवस त्या लोकांनी काढली.
 
oldest villages



खेडेगावात मूळ व्यवसाय म्हणजे. गुरे ढोरे शेळीपालन हा व्यवसाय या खेड्या गावात केला जातो. उर्वरित जर पाहिले तर जे लोक शेती करतात त्या लोकांसाठी तर फारच दैनिक अवस्था आहे. 

शेतीला पाणी देण्यासाठी जायचे म्हटले तर रात्रीची जावे लागते. कारण काही अजून भारतामध्ये अशी जुनी गावे आहेत तेथे विजेचा म्हणजेच इलेक्ट्रिसिटी पावर चा कोणताही स्रोत चांगल्या प्रकारे उपलब्ध नाही. म्हणजेच तेथे लाईन फार कमी तास पुरवठा केल्या जातो. खास करून शेतीसाठी जी लाईन दिले जाते ती रात्रीच्या वेळेस दिल्या जाते. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. 


शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा त्यांना जीव मोठी घेऊन काम करावे लागते. कारण रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांचा हिंस्र प्राणी ही त्यांच्या जीवाला धोका व त्यांच्या जीवाला दुखापत करू शकतात. 

त्यामध्ये त्यांचा एखाद्य वेळेस मृत्यू सुद्धा त्यांना येऊ शकतो. भारतातील बरेचसे गावामध्ये म्हणजेच जी जुनी गावी आहे त्या गावांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा शेतीसाठी व पिकांसाठी पाणी देण्यासाठी केले असता त्यांचा वन्यजीव प्राण्यांनी त्यांना मृत्यूच्या दारात नेले  आहे. 

जुनी गाव म्हणजे भारतामध्ये राज्य राज्यात गावामध्ये व शहरांमध्ये फारच मोठे अंतर आहे. शहराची परिस्थिती एकंदरीत पाहता खूप चांगली आहे आणि खेडेगावाची परिस्थिती खूपच वाईट आहे. गलिच्छ नाल्या घरीच अवस्थ असा हा खेडेगावातील प्रकार आहे. 

एकूणच खेडेगावाची परिस्थिती ही फारच बिकट पूर्वी होती मात्र आता थोडीफार का होईना सुधारत चालली आहे. कशी पाहायला गेले तर फार कमी विकसित ही जुनी गावी झाली आहे. गावामध्ये पूर्वी दवाखान्याची सोय नसल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे. पूर्वीचा विचार केला तर जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू हा आजार झाल्यामुळे झालेला आहे. कारण रस्त्याची सोय नसल्यामुळे त्यांना शहरापर्यंत नेण्यासाठी कोणतेही साधन नव्हते व कोणतीही वाहन नसल्यामुळे त्या लोकांना शहरांमध्ये उपचारासाठी जाण्यासाठी कोणती व्यवस्था नव्हती म्हणून त्यांचा घरीच मृत्युमुखी पडायचे. तसेच आजारपण लागल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी पैशाची व्यवस्था होत नव्हती आणि त्यांना पैसा न मिळाल्यामुळे योग्य ती उपचार घेता येत नसतात. जुन्या लोकांची परिस्थिती पाहता. खाण्यासाठी घरात अन्न नदाना नसायचा आणि खाण्यासाठी घरामध्ये धान्याचा तुटाळा जास्त निर्माण होण्याचा त्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ यायची.

भारतामध्ये एकंदरीत परिस्थिती पाहता, जुनी गावी जास्त असल्यामुळे येथील परिस्थिती पूर्वी काळी फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून भारताने जुनी गावांचा निर्माण नव्या गावामध्ये केला आहे. ही जुनी गाव निर्माण करण्यासाठी भारत सरकारने नवीन योजना तयार केली आहे. म्हणजेच भारताच्या संसदेमध्ये नवीन एक विधेयक सादर केले आहे. आणि आर्थिक बजेट तयार केले आहे. या जुन्या गावांना शहराला जोडण्यासाठी नवीन रस्ते तयार करण्याची काम सुरू केली आहे. ही योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना(PMGSY) म्हणून ओळखले जाते. ही योजना या जुन्या गावांना सुधारण्यासाठी व येथील लोकांसाठी दळणवळणाची सोय चांगल्या प्रकारे होण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना भारत सरकारने अमलात आणली आहे. आता या योजनेमुळे बरेच गावी ही नवीन गावात त्यांचे रूपांतर झाले. 

तरीपण जुनी गावे म्हटले तर, भारतामध्ये अजून बरीच काही अति दुर्गम भागात व डोंगराळ भागात ही गावी अजूनही तसेच राहिलेली आहे. त्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी या गावांच्या विकासासाठी काही निधी उपलब्ध करून देण्याचे काम चालू आहे. 

या डोंगराळ भागातल्या जुन्या गावात गेली पाहायला गेली तर, त्या गावात अजूनही बिकट परिस्थिती आहे. कारण तेथील राहणीमान त्यांची संस्कृती अजूनही वेगळी आहे. भारतामध्ये काही राज्यात काही जमातीचे लोक आदिवासी जमात ही जमात अजूनही डोंगराळ भागात राहत आहे. तिथे कोणतीह अजून दळणवळणाची सोय त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. या जगात जुनी गावी भारतामध्ये जास्त प्रमाणात आहे. आदिवासी भागात, पायाला गेले तर तिथेच सुद्धा कोणतीही आरोग्यासाठी व कोणती उपचार घेण्यासाठी दवखाना रस्ते नको ती सडक निर्माण झालेली नाही. 

असेच आम्ही एका आदिवासी भागात बघायला गेलो तर तिथे अजूनही जुन्या पद्धतीची राहणीमान आहे. त्या गावात अजूनही एका मातीच्या भांड्यामध्ये जेवण करतात. आणि पिण्याच्या साधन सुद्धा हे लोक मातीची भांडी वापरतात. आणि गावामध्ये मातीचे घरी आहेत. काही गावांमध्ये तर गवताची घरी सुद्धा आहे. तसे पाहायला गेले तर या गावांमध्ये एकही सिमेंट ची घरी नाही. संपूर्ण मातीची घरी व गवताची घरे आहे. खाण्यापिण्याची सोय म्हटलं तर त्यांना नदी , तलावातून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. कारण तिथे कोणत्याही प्रकारचा वाटर सप्लाय नाही फक्त आणि फक्त नदी आणि तलाव अशाच ठिकाणी पिण्याची पाणी निर्माण झाले आहे. कारण इथे कोणतीही सुख सुविधा अजून पर्यंत पोहोचलेली नाही. 

एकंदरीत जुन्या गावांची परिस्थिती ही फारच बिकट होती. आजच्या युगामध्ये ही परिस्थिती पाहायला गेले तर खूपच वाईट आणि दयनीय अवस्था आहे असे मानायला काही हरकत नाही. कारण आज पाहायला गेले तर भारत हा देश विकसनशील देशात आहे. 

ज्या काळात सध्या तरी लोकांनी परिस्थिती सुधारण्याचे काम चांगले प्रगतीपथावर चालू आहे. कारण खेड्या गावातील लोक आता शहराकडे निघाले आहे. कारण शहर भागात औद्योगिक वसाहती निर्माण झाल्यामुळे खेड्या गावातील लोक हे शहराकडे कामासाठी जात आहे. ते काम करून ते आपली परिवाराची भूक भागवण्याची काम करत आहे. भारतामध्ये जवळपास शहराच्या ठिकाणी औद्योगिक वसाहती तयार केले आहे. यामधून भारतातील लोकांना रोजगार निर्माण होईल असा उद्देश भारत सरकारचा आहे. 

या जगामध्ये भारत विकसनशील देश तयार झालेला आहे. भारत या देशाने चंद्रावर सुद्धा आपला ठसा निर्माण केलेला आहे. भारताने  जुन्या गावांची परिस्थिती ही सुदृढ एक नवीन गावी नवीन निर्माण केली आहे.

पूर्वीचे जुनी गावे आता नवीन गावांमध्ये रूपांतर झाले आहे. आता जुनी गावाची रूपांतर ही नवीन खेडेगावात झाली आहे. खेडेगाव हे शहराला जोडण्याची काम आणि जुने गाव सुद्धा विकसनशील झाली आहे. 

भारतातील ग्रामविकास म्हणजेच पंचायत राज व्यवस्थेने या गावाचा विकास करून घेतलेला आहे. जी पडकी घरी होती ती आता सिमेंट काँक्रेट ची निर्माण झाली आहे म्हणजेच जुने गाव हे आता तेथील ग्रामपंचायतीने विकसित केलेले आहे.

ळूहळू भारतातील प्रत्येक जुने गाव विकसित होण्याच्या मार्गाकडे निघाले आहे. जुन्या गावाची रूपांतर आता नवीन गावांमध्ये झाले आहे. ती रूपांतर करण्यासाठी भारत सरकारने पंचायत राज व्यवस्थेला वाटेल ते निधी उपलब्ध करून देण्याची काम राज्य सरकारच्या अधीन दिले आहे. तू निधी जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायत पर्यंत पोहोचण्याची काम ही युद्ध पातळीवर चालू आहे जुन्या गावची परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने हे पाऊल जनतेच्या कल्याणासाठी निवडले आहे किंवा उचलले आहे. 

आता जवळपास भारतामध्ये पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आता या भारतात म्हणजेच विकसित भारतात खेड्या गावाची रूपांतर शहरी गावांमध्ये झालेले आहे.


Living conditions and lifestyles of India

भारताची एकंदरीत परिस्थिती ही नवीन गावामध्ये आणि जुने गावाची खेडेगावामध्ये आणि खेड्या गावाची शहरीकरणांमध्ये रूपांतरीत झालेले आहे. जुनी परिस्थितीला तोंड देण्यासाठी शासनाने वेळोवेळी खेडेगावासाठी निधी उपलब्ध करून देण्याची काम केले आहे. जगाच्या पाठीवर भारताने विकासाच्या दिशेने म्हणजेच प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलले आहे. भारताची नवीन युगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारत हा विकसनशील देश झालेला आहे.

सोमवार, ८ जुलै, २०२४

जुने असई गावा हे ,भारतातील ब्रिटीश कालीन गाव / मराठे शाही आणि इंग्रज/vold village Asai

 भारतातील जुने गाव ,असई गावा महाराष्ट्रातील जालना ,जील्ह्यात व जाफराबाद तालुक्यातील हे गाव बसलेले आहे .हे गाव जुई, नदीच्या कटावर बसले आहे .असई, गाव ब्रिटीश कालीन आहे ,येथे मराठा आणि इंग्रज यामध्ये घमासान युद्ध जाले आहे. 


महाराष्ट्रातील भोकरदन आणि जाफराबाद ,या दोन तालुक्याच्या मधोमद हे गाव आहे. भोकरदन तालुक्याच्या ,पूर्व दिशेला आणि जाफराबाद तालुक्याच्या पश्चिमेला बसलेले आहे.या गावातून बरोबर मध्य भागातून  ,जुई नदी वाहते.   

vold village Asai
23 सप्टेंबर 1803 मध्ये

असई गावाची  लढाई, ब्रिटिश सरकार आणि मराठे यांच्यातील संघर्ष!


असई गावचा पूर्वीचा इतिहास जर पाहायला गेले तर, असई हे गाव फार पूर्वीचे गाव आहे. या गावांमध्ये म्हणजेच जुई नदीच्या काठावर इंग्रज आणि मराठे  महाभयंकर युद्ध झाले आहे. 


असई लढाई ही दुसऱ्या इंग्रज मराठा यांच्यात झाली आहे. एक प्रमुख लढाई होती,  मराठा संघराज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये ही लढाई झाली होती.


23 सप्टेंबर 1803, मध्ये पश्चिम भारतातील असई जवळ ही लढाई झाली होती. मेजर जनरल अर्थर वेलीस ,जो नंतर वेल्तीन्ग्चा ड्युक झाला ,याच्या नेतृत्वाखाली अल्प्संक्यांक भारतीय आणि ब्रिटीश सैन्याने ,दौलतराव शिंदे आणि बेरारच्या ,भोसले राज्याच्य सयुक्त मराठा सैन्याचा पराभव केला .



हि लढाई ,वेलीसाची पहिली मोठी विजय होता.आणि त्याने नंतरच्या युद्धामध्ये प्रसिद्ध विजय आणि वाथ्र्लुच्या लढाईत नेपोलियन बोनापोर्त चा पराभव केल्यापेक्ष्य,हि लढाई त्याची सरुत्तम कामगिरी मानले जाते .



आसईच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना ऑगस्ट 1803 पासून व्हॅलेस्सीलेची सैन्य आणि त्याची अधिनस्त करणार जेम्स यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सना मराठा गुरुदेव
 आधारित सैन्याचा पाठलाग करत होते. जे हैदराबाद मध्ये दक्षिणेकडे धडकण्याची धमकी देत होते. काही आठवड्याच्या पाटलाक गा नंतर, शिंदेने ब्रिटिश सेनेच्य स्थिती कडे जाईल तशी अत्याधुनिक फायदा आणि तोफांना यांच्यासह संयुक्त मराठा सैन्याला बळकटी दिली.


ब्रिटिश संन्याचा अधिकारी पोलीस 21 सप्टेंबर रोजी मराठा छावणीच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि त्याने आपली दोन सैन्य तीन दिवसासाठी मराठा स्थितीकडे जाण्याची नियोजन केले.
 

परंतु वेलेस चे सेने अपेक्षेपेक्षा सहा मेल दक्षिणेला मराठा सेनेचे ठिकाणी पोहोचले. संख्येने कमी असूनही वेली स तात्काळ हल्ला करण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला विश्वास होता की मराठा सैन्य लवकरच निघून जाईल. दोन्ही बाजूंनी सैनिक या लढ्यात मोठ्या प्रमाणात जखमी झालें मराठा तुफान यांनी वेलीची सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जखमी केली परंतु मराठा घोडदळाची मोठी संख्या प्रभावी ठरली नाही शिंगांची आणि घोडदळांची आक्रमणे यांनी अखेरीस मराठा सैन्याला पळून लावली परंतु त्यांची तोफ आणि गमावली परंतु वेलीचे सैन्य खूप थकलेले आणि जखमी झाली होती त्यामुळे त्यांनी पाठलाग केला नाही. 


आसईच्या विजयामुळे अहमदनगरच्या किल्ल्याचा ताबा घेण्यापूर्वी आणि अर्जुन आणि प्रवीणगड येथे विजय मिळाल नंतर दक्षिणेकडील शिंदे आणि बेरारच्या सैन्याचा पराभव केला वेलीच्या दक्षिणेकडील प्रगतीला उत्तरेकडील भारतात लेफ्टनंट जनरल जिरॉड लेखी यांच्या यशस्वी मिळण्याची साथ मिळाली आणि त्यामुळे ब्रिटिश भारताच्या हृदय प्रदेशात प्रमुख शक्ती बनले.


आता या  आसाई इतिहासातील घडामोडी 


पोहलमन छावणी सोडली आणि आपल्या तोफांना थेट समोर ठेवून केळणा, नदीच्या उंच पाठाच्या मागे आपली पायदळ बटालियन दक्षिणेकडे तोंड करून तैनात केले. मराठा घोडदळाचा मोठा जमाव उजव्या काठावर ठेवला आणि बिरारच्या अनियमित फायदा आणि असायच्या मागे तळ ठोकला नदीवर दिसणारा एकमेव क्रॉसिंग पॉईंट मराठा स्थितीच्या थेट पुढे एक लहान खुला होता. पोहल्मन रणनीती  ब्रिटिश आणि मद्रास येण्याला खोल  ओलांडून त्याच्या तोफाच्या तोंडी आणण्याची होती. आणि मग त्याच्या पायदळ आणि घोडदळावर हल्ला करणे वेली स स्थानिक मार्गदर्शनाने त्याला खात्री दिली की जवळपास दुसरा कोणताही खोला नाही .परंतु त्यांनी लवकरच फॉन्ट आक्रमणाचा पर्याय आत्महत्या सारखा मानून त्याग  केला.


पाहणी करताना त्याला दोन असुरक्षित गावे दिसली पिपळगाव आणि वरुड ,केलंना नदी च्या दोन किनाऱ्यावर मराठ्यांच्या डाव्या बाजूस दिसली या गावा दरणीय खुला असणार असल्याच्या समजुतीवरील त्यांच्या मुख्य अभियंता कॅप्टन जॉन जनसं आणखी पाहणी करण्याचे आदेश दिले .ज्याने तेथे खरोखरच एक खोल असल्याचे अहवाल दिली त्यामुळे वेलीस आपले सैन्य पूर्वेकडे क्रॉसिंग कडे नेले आणि पोहलमंच्या डाव्या काठावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.


सुमारे तीन वाजता ब्रिटिश केळणा नदीच्या उत्तरकडील
 काठावर विना अडथळा पार केली ,फक्त मराठ्यांच्या तुफानी दूरवरूनच त्यांना छळले ,परंतु ते फारसे अचूक नव्हती ,आणि वेलीस च्या ड्रॅगन ऑर्डर लिची डोके उडवण्यात यशस्वी झाले.
एकदा केळणाओलांडल्यानंतर वेलीस ने आपल्या सहा पायदळ बटालियनला दोन रेषेमध्ये तयार होण्याचे आदेश दिले .तर त्यांच्या घोडदळाच्या तिसऱ्या बटालियन रखीव ठेवली.
 त्यांच्या मित्र मराठा आणि मैसूर घोडदळांना ब्रिटिशांच्या मागे फिरवणाऱ्या मोठ्या मराठा घोडदळावर नजर ठेवण्यासाठी खेळणा नदीच्या दक्षिणेला राहण्याची आदेश दिले. वेलीच्या हेतूची लवकरच पोहल मानलं ओळख पटली आणि त्यांनी आपली पायदळ आणि तोफांना 90 अंशाच्या फिरवून नवीन रेषेत सुमारे एक मेल अंतरावर ठेवल्या. ज्यामुळे त्याची उजवीकडील काठ केळना नदीवर आणि डावीकडील काट असाई होते. 


नवीन स्थितीने मराठ्यांची काठ सुरक्षित केली परंतु पोहलामनला आपल्या संख्येने अधिक असलेल्या सैन्याला कारवाईत आणण्यास पासून प्रतिबिंबित केले. 

मराठ्यांची पुनर्रचना वेलीच्या अपेक्षा पेक्षा वेगवान आणि अधिकारी क्षमता होती. आणि त्यांनी लगेच आपली सीमारेषेची रेषा वाढवली जेणेकरून पोहलमनला त्याच्यावर आघात करण्याची संधी मिळणार नाही. 


विकेट्ससचि एक बटालियन आणि 47 व्या हायलँडर्सला ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या रेषेच्या उजव्या कडेला तयार केले होते. उजवीकडे तिरकी चालण्याचे आदेश दिले. यामुळे 78 व्या हायलँडर्सला डाव्या काठावर स्थिर करण्याची परवानगी मिळाली आणि मद्रास पायदळ बटालियन एक दहावी एक आठवी एक चौथी आणि दुसरी आणि बारावी ब्रिटिश रेशीच्या केंद्रस्थानी तयार झाला. वेलस चा हेतू त्यांना जुई नदीवर फेकून देऊन त्यांच्या घोडदळासह त्यांना संपूर्ण नाश करणे हा होता.

असईचा ब्रिटिश पायदळावर हल्ला 

मराठे शाही आणि इंग्रज
vold village Asai


लढाईची नकाशा. ब्रिटिश आणि भारतीय पायदळ मराठ्यांच्या पुनर स्थापित रेषेवर हल्ला करण्यासाठी पुढे जात आहेत. 

ब्रिटिश पुनर्रचनेसह मराठ्यांच्या  यांचा मारा तीव्र झाला. ब्रिटिश तोफखाना पुढे आणण्यात आला होता, परंतु मराठ्यांच्या तोफेच्या मोठ्या बाहेर पावरच्या विरोधात तो प्रभावी नव्हता. आणि त्यांच्यावर गोळ्याचा मारा करून लवकरच निष्क्रिय करण्यात आले. मराठ्यांच्या तुफानी पायदळावर कॅनिस्टर ग्रेट आणि राऊंड शॉटच्या बॅरेज ने हल्ला केल्यामुळे ब्रिटिशांचा बळीचा आकडा वाढला. ठरवली की त्यांच्या सैनिकांना मृत्यूच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे मराठा तुफान्याच्या तोंडावर थेट प्रगती करणे. 



त्यांनी आपली टोप सोडून देण्याचा आदेश दिला ,आणि आपल्या पायदळाला संगीनासह पुढे जाण्याचे आदेश दिले. 


मराठ्यांच्या तुकड्यांनी ब्रिटिश रेषेत शिद्री पाडली परंतु पायदळ आणि स्थिर गती कायम ठेवली त्यांची प्रगती करताना त्यांच्या रांगेतील अंतर बंद केले 78 व्या हायलाइट्स सर्वात प्रथम केळणा नदीच्या जवळच्या दक्षिण भागात शत्रूला पोहोचले त्यांनी मराठा तोफखान्यापासून 50 यार्ड 46 मीटर अंतरावर थांबून मुस्काटाच्या गोळ्या चा मारा केला. आणि नंतर संगीत हल्ला केला. 78 व्या हॉलंडच्या उजवीकडे चार मद्रास पायदळ बटालियन मद्रास पायनरसह लवकरच पोहलमंच्या रेषेला पोचले आणि त्याच पद्धतीने हल्ला केला. 


तोफखाना त्यांच्या तोफाजवळ थांबला, परंतु ब्रिटीश आणि मद्रास सेनेच्या संगीनाच्या विरोधात टिकून शकला नाही परंतु मराठ्यांचा उजवा कांड फोडून उत्तरेकडे जुई नदीकडे पळून गेले.


मद्रास बटालियनचे अधिकारी तात्पुरती नियंत्रण गमावले कारण सीपीआय यांच्या यशाने विहिरीत होऊन खूप पुढे गेले. मराठ्यांच्या गुरुद्वाराने शनीक हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु 78 व्या हॉलंड्सने पुन्हा आक्रमण केले आणि धोका दूर केला.

 

मात्र, युद्ध क्षेत्राच्या उत्तर भागात, वेलस चा उजवा काठ अडचणीत आला. पॅकेट सी कमांडर लेफ्टनंट कर्नल विल्यम रोच, त्यांच्या या देशाचा गैरसमज करून थेट असायच्या दिशेने आपला मार्ग चालू ठेवला. 74 व्या रेजिमेंटचे मेजर सॅम्युअल स्वीट अँड यांना पॅकेट्सला पाठिंबा देण्याचे आदेश देण्यात आले.



आणि ते जवळून पाटलाग करत गेले .यामुळे ब्रीठीश रेषेच्या केंद्रात मोठी फुट पडली आणि गाव भवतीच्या तोफाखाण्याकडून आणि मराठ्यांच्या डाव्या बाजूच्या तोफ्खाण्यापासून दोन्ही बटालियनवर तोफाचा मारा झाला. दोन्ही बटालियन मागे हटू लागले आणि मी आपल्या उरळीत पायदळ आणि घोडदळांना हल्ला करण्याची आदेश दिले. मराठ्यांनी कोणत्याही दया दाखवली नाही, विकेट्स जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाली. परंतु 74 व्या रेषेचे अवशेष मृतांच्या शरीरावर तातडीने चुकून बनवण्यात यशस्वी झाले. त्याच्या उजव्या काठाचा नाश होण्यापूर्वी त्याची सैन्य उघडे पडले. आणि ते दुर्बल होईल हे लक्षात घेऊन वेलीस ने कर्नल पॉटरी मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश घोडदळाच्या तुकडीला कृती आणण्याचे आदेश दिले. ज्यामध्ये 19 व्या लाईट ड्रॅगन आणि चौथी आणि पाचवी मद्रास नेटिव्ह कॅलरी घटक होती त्याच्या मागील स्थानावर आक्रमण झाले.


Asai गावचा इतिहास संपुष्टात आला आणि तेथे इंग्रज सत्ता काबीज झाली. त्यामध्ये मराठ्यांचे मोठी हाण झाली त्यामुळे येथे मराठ्यांनी बरेच इंग्रज अधिकारी मारल्या गेले. या गावांमध्ये इंग्रजांची विशेष स्थापना  आहे. ती पर्यटनाच्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. 

भारतातील हे एक जुने गाव व जुना इतिहास इंग्रजांनी मराठ्यांचा इतिहास १८०३ मधला इतिहास या गावांमध्ये खूप जुना इतिहास आहे. म्हणून ही जुने गाव इंग्रजांसाठी व मराठ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

असा सोहळा जो तूम्ही या जगात कदी पाहीलेलाच नाही/विठू माऊली चा सोहळा/महाराष्ट्राची जूनी परंपरा

  आपल्या महाराष्ट्राला पूर्वीपासूनच जुनी परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा म्हणजे, विठू माऊलीचा सोहळा संतांनी लिहून ठेवलेले आहे. अभंग द्वारे आपल...