आपल्या महाराष्ट्राला पूर्वीपासूनच जुनी परंपरा लाभलेली आहे. ती परंपरा म्हणजे, विठू माऊलीचा सोहळा संतांनी लिहून ठेवलेले आहे. अभंग द्वारे आपली संस्कृती ही मराठी संस्कृती आहे. आणि ती जोपासण्याची काम संतांनी पूर्वीपासून केले आहे. आणि त्यात संत ज्ञानेश्वरांनी चालू केलेला सोहळा आता सुद्धा पूर्वीची परंपरा या आधुनिक महाराष्ट्रात चालू आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर, या गावी विठुरायांनी आपले आगमन फार पूर्वीपासून केली आहे. त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी विठुरायावर अनेक अभंग व समाजाला संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी अभंग मार्फत जगाला व समाजाला उद्देशीत केले आहे.
प्रत्येक साधू संतांची या पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला जगातील सर्वात मोठा सोहळा भरवल्या जातो. आणि हा सोहळा पूर्वीपासून चालू आहे.
या सोहळ्याबद्दल आपण आता थोडी माहिती पाहूया, हा सोहळा पंढरपूर नगरीत कशा पद्धतीने भरवल्या जातो.
 |
विठू माऊली चा सोहळा |
महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकाराम महाराजापर्यंत व जवळपास महाराष्ट्रातील सगळ्या साधू संतांनी पंढरपूर नगरीत विठुरायाची दर्शनाची आस धरलेली होती.
आणि पांडुरंगाने महाराष्ट्रातील साधुसंतांना साक्षात दर्शनी ही दिलेली आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या अगोदर म्हणजेच पंधरा दिवस अगोदर देहू ,आळंदी या ठिकाणी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली या पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान होतात. बरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी या पालखीची आगमन पंढरपूरला होते.
या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये महाराष्ट्रातील लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सामील होतात. माऊलीच्या पालखीचे फार जुन्या काळात सुद्धा ही पालखी पंढरपूर वारी करत आलेली आहे.
संत ज्ञानेश्वरापासून ही पालखी आपली परंपरा आहे आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे नेण्याची काम पूर्वीपासून चालू ठेवलेली आहे.
जगामध्ये असा कोणता सोहळा नाही तो माझ्या विठू माऊलीची बरोबरी करेल. आणि असा सोहळा कुठेही भरू शकत नाही. पिढ्यान पिढ्या चालू असलेली ही जुनी परंपरा ही अशी चालू राहणार आहे. जगापुढे एक आदर्श म्हणून माझ्या विठू माऊलीचा सोहळा असाच माझा वारकरी दरवर्षी या सोहळ्यासाठी जेवढे काही मागे असलेला प्रपंच सोडून या सोहळ्यामध्ये सामील होतो फक्त आणि फक्त या विठू नाम गजरासाठीच जातो.
पंढरपूर नगरीमध्ये माझ्या विठू रायाची दर्शन घेण्यासाठी पंधरा दिवस पायी चालत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मधील जाऊन हळूहळू पूर्ण रस्ता स्वतःच्या पायाने चालत पंढरपूरच्या नगरीत त्याची आषाढी वारीसाठी आगमन होते. आणि तिथे तो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतो. आणि त्याला किती फार मोठी समाधान मिळलते.
आणि पौर्णिमेला हा वारकरी आपल्या आपल्या पालखीसोबत गावाकडे निघतो. जुनी परंपरा चालू ठेवून तो आपल्या पालखीत सामील होऊन परत पुन्हा आपल्या गावाकडे निघतो.
वारकरी संप्रदाय हा एक विठुरायाचा भक्त मानल्या गेलेला आहे महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला व रुक्मिणी देवीला नतमस्तक होऊन आपले सर्वस्व या पंढरपूर नगरीत अर्पण केले आहे.
महाराष्ट्रातील पंढरपुराकडी आषाढी वारीच्या दिवशी लाखो भक्तजन या पंढरपूर वारीत सामील होतात. आणि बऱ्या जिल्ह्यामध्ये पंढरपुराकडे जाण्यासाठी लोक आपल्या आपल्या सोयीनुसार पंढरपुरात दाखल होतात. जगातील एकमेव असा हा पंढरपुरातील जुनी परंपरा अजून सुद्धा चालू आहे. अतिशय शिस्तबद्ध चालू असलेला सोहळा माझ्या विठू राया आणि माऊलीचा सोहळा हा वारकरी संप्रदाय झपत आलेला आहे.
या पृथ्वीवर असा एकही सोहळा नाही जो, माझ्या विठुरायाच्या पंढरपुराची बरोबरी करू शकेल. महाराष्ट्रातील लांब लांबून लोक या पंढरपूर नगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी येतात.
आणि येथील नागरिकांनी या पंढरपूरच्या वारीत अतिशय वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा निर्माण करून ठेवलेले आहे.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून व बाहेरील प्रदेशातून दर्शनासाठी वारकरी येत असतो. त्यासाठी महाराष्ट्र शासन यांचे जाण्याची सोयीसाठी एसटी महामंडळ 24 तास यांच्या सेवेत हजर असते.
ज्ञानेश्वर माऊली आपली पालखी पंढरपुराकडे घेऊन आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील लाखो वारकरी संप्रदाय या पालखीमध्ये सहभागी होतो. या पालखीमध्ये ना कुठला भेदभाव ना कुठली जात ना कुठला धर्म सर्व धर्माची लोक या पार्टीमध्ये सहभागी होतात आणि पंढरपूरकडे जातात.
जवळपास ही पालखी पंधरा दिवस पंढरपूरला जाण्यासाठी तेवढा वेळ लागतो. पंधरा दिवस ही पालखी पायी चालत जाते. या पालखीमध्ये सर्वस्व काही हरिनामाच्या भजनामध्ये वारकरी संप्रदाय दंग होतो.
महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येने पंढरपुराकडे माऊलीच्या पालखीची प्रस्थान होते. आणि ही पालखी हळूहळू पंधरा दिवस पंढरपुराची अंतर पार करते. या पालखीमध्ये वयोवृद्ध व तरुण मंडळी सहभागी होतात आणि टाळ , मृदुंग वाजवत पंढरपूरच्या दिशेने रवाना होता.
आता आपण ,संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याकडे वळणार आहोत.
 |
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याकडे |
संत तुकाराम महाराज हे एक पांडुरंगाचे फार मोठे भक्त होऊन गेले आहे. आणि संत तुकाराम महाराजांना साक्षात पांडुरंगाची दर्शन सुद्धा दिली आहे. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु चि पदवी सुद्धा दिलेली आहे.
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू मध्ये झालेला होता. आणि त्यांना लहानपणापासून पांडुरंगाच्या भक्तीची वेड लागलेली होते. त्यांनी या जगाच्या कल्याणासाठी अनेक अभंग लिहून ठेवलेले आहे ते आजही या जगाच्या कल्याणासाठी वापरल्या जाते.
संत तुकाराम महाराजांची पालखी देहू या ठिकाणाहून पंढरपुराकडे जाते. या पालखीमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय मोठ्या लाखोच्या संख्येने देहू या गावी दाखल होतात.
आणि ही पालखी पंढरपूरच्या दिशेने जाण्याची काम करते. या पालखीमध्ये या वारकऱ्यांसाठी संपूर्ण जीवनाची राहण्याची सोय केली जाते. या पालखीची वैशिष्ट्य अशी आहे की, या पालखीमध्ये तरुण वर्ग वृद्ध ,महिला सहभागी होतात. आणि ही पालखी मोठ्या आनंदाने पंढरपूरच्या दिशेने चालत जाते.
ही पालखी पंढरपूरकडे जात असताना, या पालखीची बरेच मुक्काम होतात. आणि या पालखीचा आनंद फारच वेगळा आहे. आणि आषाढी वारीच्या दिवशीही पालखी पंढरपुरात दाखल होती. तेथे महाराष्ट्रत घरातून येणाऱ्या पालख्या आषाढी वारीच्या दिवशी एका ठिकाणी गोळा होतात.
आणि मग तिथे रंगतो वारकरी संप्रदायाचा सोहळा आणि तिथे विठू नामाचा जयघोष केला जातो. पंढरपुरात महाराष्ट्रातून येणाऱ्या पालकांची शिस्तीबद्ध सोय येथील प्रशासनाने निर्माण केली आहे.
या पंढरपूर नगरी महाराष्ट्रातून लांब लांबून लोक गोळा होतात. आणि शिस्तबद्ध दर्शनासाठी रांगा लावतात. आणि दर्शन झाल्याच्या नंतर येथे महाप्रसादाची सोय सुद्धा केलेली आहे.
महाप्रसाद घेऊन हा वारकरी संप्रदाय दुसऱ्या दिवशी आपल्या घराकडे जाण्यासाठी आतुरतेने एसटी महामंडळाची वाट बघते.
कारण पंधरा दिवसापासून चालत आलेला वारकरी हा विठुरायाची दर्शनी घेऊन आपल्या घराची वाट धरतो. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील पूर्वीपासून आणि फार जुनी परंपरा आजपर्यंत चालू आहे. माऊलीच्या पालखीची दर्शन घेण्यासाठी लोक लांबून येऊन तेथे मुक्कामाला थांबतात आणि दर्शन झाल्यानंतर आपल्या गावाकडे परत जातात.
महाराष्ट्रात आषाढी वारीच्या दिवशी एक मोठा उपवास धरल्या जातो. या उपासाला कंद ,मुळे खाऊन हा उपवास पार पाडला जातो. महाराष्ट्र मध्ये सर्व जनतेने पांडुरंगाची गावागावात पालखीचे आयोजन केलेले जाते.
जुनी परंपरा या आधुनिक महाराष्ट्रात चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी या जगाला पसायदानामार्फत उद्देशून सांगितलेले आहे. या जगाच्या कल्याणासाठी या संत महात्मा लोकांनी लिहून ठेवलेले आहे ते आजही येथील महाराष्ट्रातील जनता स्मरणात ठेवलेले आहे.
पंढरपूर नगरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा